ही संस्था शेतकरी नेते श्री प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांकरिता 2019 वर्षी सुरू केली.
संस्थेचे उद्देश
१). शेतकर्यांना संघटीत करणे व कृषी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी गट संस्थेमार्फत तयार करणे व शेतीविषय कार्यशाळांचे आयोजन करणे व शेतकर्यांना मार्गदर्शन करणे. शेतकर्यांचा सर्वागिण विकास करणे.
२). कृषी पूरक उत्पादने तयार करण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करणे, सेंद्रीय शेतीचा प्रसार व प्रचार करणे व जैविक किटक नियंत्रणासंबंधी शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यासंबधी कार्य करणे, शेतकर्यांसाठी ग्रामिण आरोग्याची योजना राबविणे, ग्रामिण व शहरी स्वच्छतेच्या विविध योजना राबविणे व लोकामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे.
३). कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, कृषी संशोधन व विस्तार करणे, कृषी संबंधीत परिचर्चा संवाद कृषि मेळावे कृषि व्यवसाय प्रशिक्षणे तसेच कृषि प्रदर्शने आयोजित करणे, कृषि तंज्ञाचे मार्गदर्शन शेतकर्यांपर्यंत पोहचविणे.
४). पाणलोट क्षेत्राचा विकास कार्यक्रम संस्थेमार्फत राबविणे मृदजलसंधारण, शेततळी तसेच इतर केंद्र व राज्य सरकारच्या कृषि विषयी असलेल्या योजना राबविणे व त्याचा लाभ शेतकस्यांपर्यंत संस्थेमार्फत पोहचविण्याचे कार्य करणे.
५). जैविक शेती, गांडुळ खते तथा सैन्द्रीय शेती करण्याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करणे. कृषी क्षेत्रात येणार्या नविन संशोधनाचा लाभ शेतकर्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणे.
६). शिवार फेरीचे आयोजन करणे तसेच आधुनीक पध्दतीने शेती करण्याकरीता शेतकर्यांना प्रोत्साहीत करणे.
७). संस्थेमार्फत स्वंय रोजगार सुरू करण्यास प्रोत्साहन देणे व मार्गदर्शक शिबीरांचे आयोजन करणे. कृषी प्रदर्शने तथा कृषी मेळाव्यांचे आयोजन संस्थेमार्फत करणे तथा शेतकर्यांचे विविध प्रश्न व समस्या शासन दरबारी मांडणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. तसेच केन्द्र व राज्य शासनाच्या शेतकर्यांसाठी असणार्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांपर्यंत संस्थेच्यामाध्यमातुन पोहचविण्याचे कार्यकरणे.
८). कृषी संलग्न क्षेत्रातील पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य, रेशम, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन यांचे प्रशिक्षण केंद्र चालविणे व त्याकरीता प्रोत्साहन देणे. शेतकरी वर्गाची पुर्णत आत्महत्या थांबविण्या करिता प्रयत्न करणे तसेच त्याकरीता त्यांचे मनोबल वाढविणे.
९). मातीची तपासणी, कापसाची पुर्णतः प्रयोग शाळेत चाचणी करून योग्य भाव व जागतीक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करणे.
१०). शेतकरी व शेतकरी कुटुंबाच्या आरोग्य विषयक योजना राबवुन शेतकर्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती करणे.
११). शेतकर्याच्या आर्थिक उन्नतीकरीता शेतकर्यांना व्यवसाईक शिक्षण देण्याकरीता प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत करणे. शेतकर्यांना शेतीच्या मशागतीबाबत आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढीस मदत करणे व शेती बाबातच्या औजाराचे वाटप करणे.
किसान ब्रिगेड ज्ञापन नोंदणी कार्यालय
कार्यालयाचा पत्ता : ३ रा माळा, निशांत टॉवर, गांधी रोड अकोला